प्रत्येक गावाची एक संस्कृती

प्रत्येक गावाची एक संस्कृती असते. त्या नुसार ते गाव जगत असते. गावाचे स्वभाव घडत असतात. यात कोणीच काहीच न ठरवता हे घडत असते.
त्या गावाचे रहिवासी हा स्वभाव घडवतात की गाअ रहिवाशांचे स्वभाव घडवते हे सांगणे कठीण.
आता हेच बघा ना
कोल्हापुरकर म्हंटले की मनमोकळा कुस्ती आणि चित्रकलेवर मनापासून प्रेम करणारा हेच डोळ्यापुढे येते.
अंबाबाई आणि जोतिबा यांच्या यात्रेच्या आठवणी काढणारा शाहु महाराज आणि त्यानी मारलेल्या वाघांच्या शिकारीच्या गप्पा , खासबाग मैदानात कधी काळी झालेल्या मारुती माने /सत्पाल /बिराजदार यांच्या कुस्त्यांच्या आठवणीत रंगणारा कोल्हापुरकर.
पांढरा तांबडा रस्सा दिलखुलास खिलवणारा कोल्हापुरकर.........
पहिल्याच भेटीत एखाद्याला आपले मानणारा / फारसे आतबाहेर न ठेवता बोलणारा कोल्हापुरकर. त्यांच्याशी बोलताना ते तुम्हाला सुद्धा राजे बनवून टाकतील. स्त्रीया सुधा बोलताना मी आलो होतो असे सहज म्हणून जातील. त्यांच्या लेखी आलो होतो / गेलो होतो हे दोन शब्द नसून मी आल्तो मी गेल्तो अशी जोडाक्षरे होतील. एखादी मुलगी घरात आली तर " आलास काय गा"? असे आई विचारेल
"तो यायला लागला आहे" हे अख्खे वाक्य " तो यायलाय" एवढ्या दोन शब्दात आटोपेल.
कोल्हापूरकर आंबाबाईच्या देवळात गेला तर चपलाची चिंता न करता सावकाश दर्शन घेईल.
कोल्हापुरकर राजकारणाबद्दल फारसे बोलणार नाही पण थोरले महाराज , चित्रकार दलाल , बाबुराव पेंटर यांच्याबाबत बोलताना तो खुलतो.

सांगलीची गोष्ट थोडी वेगळी.
कोल्हापुर ला राजे होते सांगलीला संस्थानीक होते. राजा आणि संस्थानीक यात असेल तेवढा फरक या जवळ जवळ वसलेल्या दोन्ही गावांत आहे . राजेपणाची मस्ती नसेल; संस्थानीकाचा हिषेबीपणाआहे.
सांगलीकर गणपतीच्या देवळात रमेल पण तेवढ्याच पटकन देवळातून पाय बाहेर काढून जयसिंगपुरच्या एम आय डी सी त निघेल.
हळद वायदेबाजारात जाईल. गप्पा हाणताना दादा बापू भाऊ या पेक्षा जास्त बोलणार नाही. पण राजकारणात मुरलेला असेल.
जेवणात कोल्हापुरी तर्री नसेल ब्राम्हणी पुरणपोळी असेल. कोल्हापूरकराला मिसळीची नशा असेल सांगलीकर गोरे बंधू भडंगावर समाधान मानेल.
सांगलीकर बोलताना कोणत्याही व्यक्तीला " ते " बनवतील. आदराने नव्हे भाषेच्या लहेज्यामुळे. कॉलेजचे प्राचार्य आले तरी " ते येतय बघ " असे म्हनतील.
तुम्ही त्याना चहा पाजलात तरी ते आपल्या गावच्या चौकात " इंदीराभुवनच्या " शेजारी ये तुला असा चहा पाजतो असा चहा पाजतो असा चहा पाजतो असे म्हणतील. स्वतः निवान्त चहा पिईल आणि आपल्याला घाई करेल

मुम्बैकर मुम्बैत एकदम पटकन कोणाबरोबरही मोकळा न होणारा पण एकदा मुम्बै बाहेर पडला की स्वतःची सामान्यत्व कबूल करत सहज संवाद साधतो.
तो वर्तमानपत्राची घडी सुद्धा उभी घालतो.
जागा आणि जागांचे भाव हे कोणत्याही मुम्बै कराचे जिव्हाळ्याचे विषय.
एरवी शेजार्‍याशी ही फारसा संभाषण करणार नाही पण वेळ पडली तर न मागता सुद्धा अनोळख्याला भरभरून मदत करेल.
तुम्ही एखादा पत्ता विचारा ठाऊक असेल आणि शक्य असेल तर मुम्बैकर तुम्हाला केवल पत्ता सांगून थांबणार नाही. दाखवायला ही येईल/
पुण्यात हा अनुभव भलताच वेगळा येतो. पावसात तुम्ही भिजताय मुम्बैकर तुम्हाला आपल्या छत्रीत जागा देईल. रांगा लावणे हे मुम्बैकराच्या हाडीमांसी इतके भिनलेले आहे की बागेत छोटी मुले सुद्धा घसरगुंडीसाठी रांग लावून उभी रहातील

सातारकर हे तिरकस बोलण्यात पटाईत. काय कसे आहात ? या प्रश्नाला " बरे आहे/ मजेत आहे" असली सरळ उत्तरे न येता " मला काय धाड भरली आहे" असला निरुत्तर करणारा प्रश्न सातारकरच विचारु शकतो.
चर्चेत हिरीरीने भाग घेईल. सकाळी सकाळी भारत भुवनची रस्सेदार पुरी भाजी हा यांचा आवडता नाश्ता. पंधरा ऑगस्ट ला रस्तोरस्ती लागणारे जिलेबीचे स्टॉल हे सातार्‍याचे एक वैषिष्ठ्य.
अशोक मोदी ची किंवा लाटकरची आंबा बर्फी / पेढे हे जिव्हाळ्याचे विषय. नुकत्याच कोठेतरी झालेल्या राज्यस्तरीय एकांकीका स्पर्धेत अमूक एका एकंकिकेत लाईट ची अ‍ॅरेन्जमेन्ट कशी चुकीची होती/ अमूक एकाने दिग्दर्शन कसे करायला हवे होते ही चर्चा उद्यासाठी अर्धी राखून ठेवत अर्धा ग्लास दुध पिऊन रात्री दोन वाजता घरी जाणे हे सातार्‍यातच नियनीतपणे होऊ शकते.
दिवाळीच्या दिवशी न ठरवताही खिंडीतल्या गणपतीला भेटणारे आख्खे गाव हे सातारकरच करु जाणे
सातार्‍याची एम आय डी सी कशी झोपली या चर्चा बारामतीमुळे हे असे झाले या निष्कर्षला येतात.

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज ज्ञावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।
भूतां परस्परे पडो । मैत्र जीवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्र्मे जे अलांछ्न । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ।

येथ म्हणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

आता विश्वात्मकें देवें येणे वाग्यज्ञें तोषावें
तोषोनिं मज ज्ञावे पसायदान हें

जें खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी- रती वाढो
भूतां परस्परे पडो मैत्र जीवाचें

दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्यें पाहो
जो जे वांच्छिल तो तें लाहो प्राणिजात

वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी
अनवरत भूमंडळी भेटतु भूतां

चलां कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचें गाव
बोलते जे अर्णव पीयूषाचे

चंद्र्मे जे अलांछ्न मार्तंड जे तापहीन
ते सर्वांही सदा सज्जन सोयरे होतु

किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी
भजिजो आदिपुरुखी अखंडित

आणि ग्रंथोपजीविये विशेषीं लोकीं इयें
दृष्टादृष्ट विजयें होआवे जी

येथ म्हणे श्री विश्वेशराओ हा होईल दान पसावो
येणें वरें ज्ञानदेवो सुखिया जाला

= ज्ञानेश्वर माउली

marathi kavita

तुझं आणि माझं जमणार तरी कसं?

तुला लागतो चहा , मला लागते कॉफ़ी
तुला नाही आवडत मी ऊलटी घातलेली टोपी
तुला वाजते थंडी , मला होतं गरम
तू आहेस लाजाळू , मी अगदीच बेशरम
तुझं आणि माझं जमणार तरी कसं?

झोपतेस तू लवकर आणि उठतेस पहाटे
आवडत नाही तुला बॉक्सिंग आणि कराटे
मी मात्र झोपतो बाराच्या नंतर
रविवारी नसतं क्रिकेटशिवाय गत्यंतर
तुझं आणि माझं जमणार तरी कसं?

फ़िरायला आवडतं , आवडतं तुला शॉपिंग
कपड्यांबद्दल बोलतेस अगदी विदाऊट स्टॉपिंग
मला मात्र खरेदीचा येतो कंटाळा
कळत नाही रंग राखाडी आहे की काळा
तुझं आणि माझं जमणार तरी कसं?

घालतो मी शर्ट इस्त्री न करता
जाऊन येतो एकटाच इतरांच न ठरता
तू मात्र बघतेस मैत्रिणींची वाट
बाहेर निघताना नखरे सतराशे साठ
तुझं आणि माझं जमणार तरी कसं?

मला नसतात लक्षात वाढदिवसाच्या तारखा
जातो बाजाराला पण काम विसरतो सारखा
तुला मात्र आठवते पाचवीतली मैत्रिण
बारीक तुझी नजर , डोळे आहेत की दुर्बीण?
तुझं आणि माझं जमणार तरी कसं?

एक सांगू का तुला ?
हे सगळं असुनही आहे तसं जमवुया का आपण?
ऊन आणि सावली राहतात ना जसं
तुझं आणि माझं जमेल का तसं?



कॉलेज गारवा
Syllybus जरा जास्तच आहे
दर वर्षी वाटतो...
Chapters पाहून Passing चा
Problem मनात दाटतो...

तरी lectures चालू राहतात
डोक्यात काही घुसत नहीं....
चित्र-विचित्र figures शिवाय
Board वर काहीच दिसत नाही....

तितक्यात कुठून तरी Function ची
Date जवळ येते...
Sem मधले काही दिवस
नकळत चोरून नेते...

नंतर lecturers Extra घेउन
भरभरा शिकवत राहतात...
Problems Example Theory सांगून
Syllybus लवकर संपवू पाहतात...

पुन्हा हात चालू लागतात...
मन चालत नाही....
सरांशिवाय वर्गामध्ये
कुणीच बोलत नाही...

Lectures संपून Submission चा
सुरु होतो पुन्हा खेळ..
journal Complete करण्यामध्ये
फार फार जातो वेळ...

चक्क डोळ्यांसमोर Syllybus
चुटकी सरशी sampun जातो..
'PL's मध्ये वाचून सुद्धा
Paper काबर सो...सो.. जातो?????

तुला दोन मुले जाली मी अजुन शिकतो आहे............ !
तुला दोन मुले जाली मी अजुन शिकतो आहे............ !
कळत नाही तुज बरोबर की मी कुठेतरी चुकतो आहे,
तुला दोन मुले जाली मी अजुन शिकतो आहे............ !
B.Sc
करून Bad जालो M.Sc करून Mad जालो,
सुखाच्या शोधात मी फक्त फक्त Sad जालो,
शिकतो तरी लोक म्हणतात मी कुठेतरी हुकतो आहे,
तुला दोन मुले जाली मी अजुन शिकतो आहे............ !
किती सहज म्हानाली होतीस की 'तुला लागणार का नोकरी..?
नोकरीच नाही तुला तर कोण देणार छोकरी..?
तुज्याविना, नोकरिविना मी मात्र सुकतो आहे,
तुला दोन मुले जाली मी अजुन शिकतो आहे............ !
तुजा मुलगा मामा म्हणतो याच थोड वाईट वाटत,
तुज्या नवरयाच साध शेकहैण्ड मला जबरदस्त फाइट वाटत,
हसरा हसरा संसार तुजा रडता रडता बघतो आहे,
तुला दोन मुले जाली मी अजुन शिकतो आहे............ !
मला बक्षीश मिळाले की तूच टाळ्या वाजवायची,
सर्वांदेखत अभिनन्दन करून मला मात्र लाजवायची,
तुज्याविना कित्येक सत्कार आज गळ्यामधे टाकतो आहे,
तुला दोन मुले जाली मी अजुन शिकतो आहे............ !
किती बोलायचो आपन बोलण्यावर बंधन नसे,
मी जालो विस्तव की तुज्या शब्दात चन्दन असे,
आता केवळ ओठवरती मी कुलुप ठोकतो आहे,
तुला दोन मुले जाली मी अजुन शिकतो आहे............ !
बाप राब राब राबतोय मायचे हाल सांगत नाही,
उगाच तुला माज्यासाठी सहानुभूति मागत नाही,
फी साठी पार्ट टाइम जॉब करून रोज रोज थकतो आहे,
तुला दोन मुले जाली मी अजुन शिकतो आहे............ !
माज्या गळ्यात पडलाय नुसता वचनांचा नाग,
नोटांच्या बंडलानी लागली शिक्षनाला आग,
तरीही या अग्निकुंडामधे स्वताला जोकतो आहे,
तुला दोन मुले जाली मी अजुन शिकतो आहे............ !
नोकरी नाही, भाकरी नाही, एवढाच गुन्हा नसतो,
थोडा विश्वास ठेवायचा होता माज्या अंगातही होत रक्त,
येओ आता वादले कितीही, दिवा माजा टिकतो आहे,
तुला दोन मुले जाली मी अजुन शिकतो आहे............ !
तुला दोन मुले जाली मी अजुन शिकतो आहे.........




एक अबोल प्रेम फुललेच नाही !!
एक अबोल प्रेम फुललेच नाही !!
दोघांच्याही मनात होतं,
दोघांनाही ते ठाऊक होतं
कुनी कधी काही बोललेच नाही…..
एक अबोल प्रेम फुललेच नाही !!
जाण्या-येण्याच्या वेळाही एक,
ठरुनच गेल्या होत्या बहुतेक
वाटा दोहोंच्या जुळल्याच नाही
एक अबोल प्रेम फुललेच नाही !!
नजर भिरभिरते,एकमेंका शोधते;
दृष्टा-दृष्ट झाल्यास मनी सुखावते
नजरेपलिकडे काही घडलेच नाही
एक अबोल प्रेम फुललेच नाही !!
नसेना का घडले मिलन परि…
आजन्म फुलतिल प्रेमांकुर ऊरी
नियतीचे कोडे कधी उलगडलेच नाही!






तु मला खुप आवड्तेस

तु मला खुप आवड्तेस

अस तिच्या कानात जाउन सान्गाव

तिच्या मनात काय आहे

ते पट्कन तिच्या ओठावर याव

तुझ्या डोळ्य़ात कहीतरी आहे

अस म्हणत चट्कन नजरेत नजर मिसळावी

तुझ्या केसात काहीतरी पड्ल म्हणत

काळ्याभोर रेशमी केसाना हात लावावा

.

मच्छर बसला होता अस सान्गुन

गो

-या हातावर एक चापट मारावी .

मग तिने राग आल्यासा्रख करुन

चापटीने त्वचेवरची लाली दाखवावी

कधी नकळ्त तिचा हात हातात घ्यावा

आणी तिचा नाजुक उबाबदार स्पर्श व्हावा

जाणीव होताच तिने हात खेचुन घ्यावा

वाट्त असा शण दिवसातुन एकदातरी यावा

समोर उभी असताना नजर सळसळत असते

तिला वाट्ते माझी नजर तिलाच बघत असते

मग काहीतरी फ़ेकुन मारण्याची धमकी देत असते

तर कधी मी निघुन जाईन अशी भिती दखवत असते

Travle spot in Satara (WAI)


SATARA(WAI)





Satara District is located in the western part of Maharashtra. It is bordered by Pune District in the north, Solapur District in the east, Sangli District in the south, Ratnagiri District in the west and Raigad District in the north-west. The main rivers are Koyna and Krishna. Bajra, jowar, wheat, rice, sugarcane, groundnut and potato are the Main crops.

Satara was once the capital of Maratha kingdom. Karad city is an old place where you can find temples and Buddhist caves. Ajinkyatara Fort, Char Bhinti Hutatma Smarak, Thoseghar Waterfall, Kas Talav (lake), Natraj Mandir, Tapola Lake (for boating) and Pratapgad Fort are the major tourist spots. Kuraneshwar Temple, Yevateshwar Temple, Shikhar Shinganapur Temple, Siddhanath Temple at Mhaswad, Yamai Devi Temple at Aundh and Bhavani Temple on Pratapgad are some of the holy places. Satara District is famous for the Shivaji Museum at Satara and Bhavani Museum at Aundh.
Wai also is famouse Travle spot in Satara District in Wai , the Dholya Ganpati Mandir , Kishiwishwashwar Mandir is famouse spot in wai city, also the MARAHI VISHVAKOSH KARALYA is present in Gangapuri in Wai .


Around the wai many travle spot avilable like Manavli , Kamlgad Fort , Pandavgad Fort , Rayreshwar Fort , Dohum DAM , Viratgad Fort , CHANDAN VANDAN FORT ,
Kalubai Mandir , Bhavani Mata Mandir Asle , BHRAVNATH MANDIR KIKALI (Near BHUINJ), near from that the KISAN VEER SUGAR INDUSTRY , in that industry many project are avilable to see Specialy AKHAND HARINAME SAPTAHE.
From wai we can go to PANCHAGANI , MAHABALESHWAR are the famouse spot is present.


UTKARSH SHINDE
9890117570