पाउस, ती आणि बावळट....!

घराकडे येताना मला काल पावसाने गाठले,

जोरदार होता पाउस, सगळीकडे तळे साठले....!

भिजत-भिजत जात होतो घराकडे...तेवढ्यात आवाज दिला कोणी,
वळून बघता मागे, दिसली आमच्या कॉलेजची राणी...!

जिच्यावारती झुरत होतो, जी देत नव्हती मला भाव,
तिने साद घालून काळजावरती केला 'प्रेमळ' घाव...!

तीही होती भिजलेली, अंगात थंडी भरलेली,
लाल पंजाबी ड्रेस, अन् त्यावर matching लिपस्टिक लावलेली...!

"भिजत कशाला जातोस...? पाउस जाईपर्यंत माझ्या घरी थांब",
"राहते जवळच मी, नाही जास्त लांब...."

ऐकून शब्द तिचे ते पावसात आला मला घाम,
टाळण्यासाठी म्हटलो मी, "मला आहे जरा काम...!"

बराच आग्रह करून ती मला घरी घेउन गेली,
स्वत:च्या हाताने तिने मग कॉफी तयार केली...!

कॉफी देताना तिच्या चेह~यावरचा पाण्याचा थेंब कपात पडला,
त्यामुळे कदाचित कॉफीचा गोडवा अजुनच ज़रा वाढला...!

अचानक तिला आमच्या प्रेमाचा साक्षात्कार कसा हो घडला...?
लाजत म्हटली, "तुझ्या प्रेमाचा ज्वर मजवर चढला...!!!"

"उठ रे मेल्या...! कॉलेजात जायचे की नाही...?"
स्वप्न होते, सत्य नाही... झोपेतून उठवत होती आई...!

स्वप्न आठवून हसलो जरासा
कॉलेजात जेव्हा दिसली राणी,
मैत्रिणींशी थट्टा करत
मला ती 'बावळट' म्हणुन गेली...!!!

आम्ही अशा देशात राहतो:

जिथं पोलिस आणि रुग्णवाहिकेपेक्षाही लवकर तुमच्या घरी "पिझ्झा" पोह्चतो,
जिथं वाहन कर्ज ५% तर शैक्षणिक कर्ज १२% नी मिळतं,
जिथं तांदुळ ४० रु. किलो तर "सिमकार्ड" मोफत मिळतं,
जिथं एक लखपती लाखो रुपये देवुन क्रिकेटचा संघ विकत घेतो, मात्र तीच रक्कम दान नाही करत,
जिथं पायात घालायच्या चपला/ बुटं वातानुकुलित दुकानात विकली जातात तर पोटात घालायच्या पालेभाज्या उघड्या रस्त्यावर विकल्या जातात,
जिथं प्रत्येकाला प्रसिध्दी हवी आहे, मात्र त्यासाठी कुणी सत्-मार्ग अवलंबण्यास तयार नाही,
जिथं लिंबाच्या पेयात कृत्रिम स्वाद मिळवला जातो, मात्र भांडी धुण्याचा साबणात अस्सल लिंबु असतं,
जिथं
चहाच्या टपरीवर लोक "बालमजुरी" वरच्या वर्तमान पत्रातील बातम्यांवर चर्चा
करतात - म्हणतात "यार, बाल-मजुरी करवणार्‍यांना फासावर लटकवलं पाहिजे"
.... आणि नंतर आवाज देतात...."छोटु.... दोन चहा घेऊन ये...!"

..... तरीसुध्दा ...... माझे माझ्या देशावर प्रेम आहे!

घरापासून दूर .......................

घरापासून दूर .......................
मी घरी कीतीही दिवसभर दंगा केला
तरी मला आई थोपताल्याशिवय कधीच झोपली नाही
घरापासून दूर म्हणुनच आता कदाचित
शांत झोप कधी लागलीच नाही

कुणी वीचारते "तुला घरी जाऊस वाटत नाही"?
कसा सांगू त्यांना घरातून निघताना
आईला मारलेली मीठी सोडवत नाही

आई तू सांगायची गरज नाही
तुला माझी आठवण येते
आता माझ्यासाठी डब्बा करायचा नसतो
तरीही तू सहा वाजताच उठतेस

तुझ्या हातचा चहा तुझ्या हातची पोली
तुझ्या हातची माझी न आवडती भाजी खायला
आजही जीभ आसुसली

घरापासून दूर .......
आई जग खुप वेगले आहे
तुझ्या सावलीत अगदी बिनधास्त होतो
आता रानागानत उन आहे

तू आपल्या पील्लान साठी
सगला केलस एक दीवस पिल्लं म्हणाली
आई आता आम्हाला जायचय
आंनी तू त्यांना जाऊ दीलस

आई तू इथे नाहीस
बाकी माझ्याकडे सगळे आहे
घरापासून दूर
जग खुप वेगले आहे

छत्रपती शिवाजीराजे भोसले एक राजे एक उत्तम शासनकर्ता



छत्रपती शिवाजीराजे भोसले

मराठी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले एक सर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणून महाराष्ट्रात आणि इतरत्रही वंदिले जातात. शत्रूविरुद्ध लढ्याकरता महाराष्ट्रातल्या डोंगर-दर्‍यांमधे अनुकूल असलेली गनिमी काव्याची पद्धत वापरून त्यांनी तत्कालीन विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि बलाढ्य मुघल साम्राज्यशाही ह्यांच्याशी लढा दिला, आणि मराठी साम्राज्याचे बीजारोपण केले. आदिलशाही, निजामशाही आणि मुघलसाम्राज्य बलाढ्य असली तरी महाराष्ट्रात त्यांची सगळी भिस्त स्थानिक सरदारांवर आणि किल्लेदारांवर होती. ते सरदार/ किल्लेदार जनतेवर अन्याय-अत्याचार करत असत. शिवाजीमहाराजांनी त्या अन्याय-अत्याचारातून जनतेची सुटका केली, आणि उत्तम शासनाचे एक उदाहरण भावी राज्यकर्त्यांसमोर ठेवले.
जिजाबाई ह्या शहाजीराजांच्या प्रथम पत्‍नी. शिवाजीमहाराजांचा जन्म जिजाबाईंच्या पोटी इ.स. १९ फेब्रुवारी १६२७ (फाल्गुन कृष्ण तृतीया) रोजी पुण्यापासून ४० मैलांवर असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर झाला.
आदिलशहाच्या ताब्यात असणारे किल्ले जिंकत राहिल्यामुळे इ.स. १६५९ साली आदिलशहाने दरबारात शिवाजी महाराजांना संपविण्याचा विडा ठेवला. हा विडा दरबारी असलेल्या अफझलखान नावाच्या सरदाराने उचलला. मोठ्या सैन्यासह आणि लवाजम्यासह अफझलखान मोहिमेवर निघाला. अफझलखान वाईजवळ आला तेव्हा शिवाजीराजांनी सध्याच्या महाबळेश्वर जवळ असलेल्याप्रतापगडावरून त्यास तोंड देण्याचे ठरवले. तहाची बोलणी सुरू झाली आणि अंतिम बोलणीसाठी शिवाजी महाराजांनी स्वतः यावे असा अफझलखानचा आग्रह होता. पण शिवाजीराजांच्या वकिलांनी (पंताजी गोपीनाथ बोकील) अफझलखानाला गळ घालून प्रतापगडावरच भेट घेण्यास बोलावले. भेटीच्या नियमांनुसार दोन्ही पक्षांकडील मोजकीच माणसे भेटीसाठी येतील आणि दरम्यान सर्वांनी निशस्त्र राहण्याचे ठरले.
शिवाजीराजांना अफझलखानच्या दगाबाजपणाची कल्पना असल्यामुळे त्यांनी सावधानी म्हणून चिलखत चढविले आणि सोबत बिचवा तसेच वाघनखे ठेवली. बिचवा चिलखतामध्ये दडविला होता तर वाघनखे हाताच्या पंजाच्या आतमध्ये वळविलेली असल्यामुळे दिसणारी नव्हती. शिवाजी महाराजांसोबत जिवा महाला हा विश्वासू सरदार होता तर अफझलखानसोबत सय्यद बंडा हा तत्कालीन प्रख्यात असा दांडपट्टेबाज होता. प्रतापगडावरील एका छावणीमध्ये भेट ठरली. भेटीच्या वेळी उंचपुर्‍या, बलदंड अफझलाखानने शिवाजी महाराजांना मिठी मारली आणि शिवाजीराजांचे प्राण कंठाशी आले. त्याच वेळी अफझलखानने कट्यारीचा वार शिवाजी महाराजांवर केला परंतु चिलखतामुळे शिवाजीराजे बचावले. अफझलखानाचा दगा पाहून शिवाजीराजांनी वाघनखे खानाच्या पोटात घुसवली. त्याचबरोबर अफझलखानाची प्राणांतिक आरोळी चहूकडे पसरली. सय्यद बंडाने तत्क्षणी शिवाजीवर दांडपट्ट्याचा जोरदार वार केला जो तत्पर जिवा महालाने स्वतःवर झेलला आणि शिवाजीराजांचे प्राण वाचले. यामुळेच "होता जिवा म्हणून वाचला शिवा" ही म्हण प्रचलित झाली.
आधीच ठरलेल्या इशार्‍याप्रमाणे भेटीच्या वेळी तीन तोफांचे बार प्रतापगडावरून काढण्यात आले, आणि खानाच्या छावणीच्या जवळपासच्या झाडाझुडुपांमध्ये दडून बसलेल्या मावळ्यांनी हल्ला करून खानाच्या सैन्याची दाणादाण उडविली. खानाचा मुलगा फाजलखान आणि इतर काही सरदार लपूनछपून वाईच्या मुख्य छावणीपर्यंत आले. इथे खानाचा जनाना होता. ते पाठलागावर असलेल्या नेताजीच्या सैन्यापासून वाचण्यासाठी खजिना, हत्ती व इतर जड सामान टाकून विजापूरला जनान्यासकट पळाले.
शिवाजीराजांना जनतेत मिळालेला आदर आणि प्रेम अनेक शतकांनंतरही टिकून आहे त्यामागचे त्यांची सहिष्णू वृत्ती हे फार महत्त्वाचे कारण आहे. अफझलखानाच्या मृत्यूनंतर त्यांनी त्याच्या शवाचे अंत्यसंस्कार इस्लामी पद्धतीने करुन त्याची एक कबर प्रतापगडावर बांधली आणि त्या कबरीच्या कायम देखभालीची व्यवस्था केली.

अफझलखानच्या मृत्यूनंतर शिवाजीराजांनी दोरोजी नावाच्या सरदाराला कोकणपट्ट्यातील आणखी किल्ले आणि प्रदेश जिंकण्यास पाठवले. स्वतः राजे सातारा प्रांतात घुसून कोल्हापूरापर्यंत गेले व त्यांनी पन्हाळा जिंकून घेतला. नेताजीने त्याच्या सैन्यासह जवळपास विजापुरापर्यंत धडक मारली.

पहा प्रतापगडची लढाई
सिद्दी जौहरचे आक्रमण

अफझलखानच्या मृत्यूमुळे चिडलेल्या आदिलशहाने त्याचा सेनापती सिद्दी जौहर यास सर्व शक्तीनिशी हल्ला करण्याचा आदेश दिला. इ.स. १६६० साली झालेले हे आक्रमण स्वराज्यावरील अनेक मोठ्या संकटांपैकी एक समजले जाते. त्यासुमारास शिवाजीराजे मिरजेच्या किल्ल्याला वेढा घालून होते. सिद्दीच्या आक्रमणाची बातमी येताच राजे पन्हाळगडावर गेले आणि सिद्दी जौहरला त्याचा सुगावा लागताच त्याने गडालाच वेढा घातला आणि गडाची रसद तोडली. काही दिवस गडावरील सर्वांनी तग धरली पण सिद्दीचा वेढा उठण्याचे काही लक्षण दिसेना तेव्हा सर्वांशी खलबत करून शिवाजीराजांनी जवळच्या विशालगडावर पोहोचावे असा निर्णय घेतला. पन्हाळगडावरून एके रात्री शिवाजीराजे आणि काही मंडळी गुप्त रस्त्याने शिताफीने निसटले. ह्याचा पत्ता लागताच सिद्दी जौहरने सिद्दी मसऊदच्या बरोबर काही सैन्य पाठलागावर रवाना केले.
घोडखिंडीतली लढाई

पहा पावनखिंडीतील लढाई

पन्हाळगडापासून काही अंतरावर वाटेत सिद्दीच्या सैन्याने त्यांना घोडखिंडीत गाठले आणि हातघाईची लढाई सुरू झाली. तेव्हा शिवाजीराजांचे विश्वासू पराक्रमी सरदार बाजी प्रभू देशपांडे यांनी शिवाजीराजांना विनंती केली की त्यांनी विशालगडासाठी पुढे कूच करावी आणि खिंडीतील लढाई स्वत: लढतील. विशालगडावर पोहोचताच तोफांच्या तीन डागण्या ऐकू आल्या म्हणजे शिवाजीराजे सुखरूप गडावर पोहचले असा संदेश मिळेल. बाजी प्रभू देशपांड्यांनी वचन दिले की जो पर्यंत तोफांचे तीन आवाज ऐकू येणार नाहीत तो पर्यंत सिद्दी जौहरला खिंडीमद्ध्येच झुंजवत ठेवतील. शिवाजीराजांना ते पटेना पण 'बाजी'च्या विनंतीवजा हट्टापुढे त्यांनी यास मान्यता दिली आणि विशालगडासाठी कूच केले. बाजींनी सिद्दीच्या सैन्याला रोखून धरण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली, पण संख्येने कितीतरी पटीने अधिक सैन्यापुढे बाजीप्रभूंनी प्राणांची बाजी लावली. ते स्वतः प्राणांतिक रीतीने घायाळ झाले होते. शेवटी सैनिकांनी मृत्युपथावर असलेल्या घायाळ बाजींना एके ठिकाणी आणून बसविले, पण बाजींचे प्राण कानाशी साठले होते. थोड्या वेळाने तोफांचे तीन आवाज ऐकू आले आणि शिवाजीराजे गडावर पोहोचल्याचा तो संदेश समजल्यावरच बाजी प्रभू देशपांडे यांनी प्राण सोडले. शिवाजीराजांना ही बातमी फार चटका लावून गेली. बाजीप्रभू हे ज्या घोडखिंडीत लढले आणि स्वतःच्या प्राणांचे बलिदान दिले त्या घोडखिंडीचे नाव शिवरायांनी पावनखिंड असे बदलले. बाजीप्रभूच्या बलिदानाने पावन झालेली ती पावनखिंड.
मुघल साम्राज्याशी संघर्ष

मुघल सत्तेशी संघर्ष हा शिवचरित्राचा व्यापक आणि अविभाज्य भाग आहे. तत्कालीन मुघल साम्राज्य हे भारतातील सर्वात बलाढ्य होते आणि औरंगझेब हा अतिशय कठोर आणि कडवा मुघल बादशहा दिल्ली येथे शासन करीत होता.
शाहिस्तेखान प्रकरण

मुघल साम्राज्याचा नर्मदा नदी पलीकडे विस्तार तसेच शिवाजी महाराजांच्या राज्यविस्ताराला वेसण घालणे या दोन हेतूंसाठी औरंगझेबाने त्याचा मामा शाहिस्तेखान याला दख्खनच्या मोहिमेवर पाठविले. प्रचंड मोठा लवाजमा, सैन्य आणि फौजफाटा सोबत घेऊन शाहिस्तेखान निघाला आणि वाटेत असणार्‍या प्रत्येक राज्यात, गावात त्याने दहशत पसरवीत जमेल तेवढा जमेल तेथे विध्वंस केला. शेवटी पुण्याजवळील चाकणचा किल्ला जिंकून पुण्यातील शिवाजीराजांच्या लाल महालातच तळ ठोकला. शिवाजीराजांनी खानाचा बंदोबस्त करण्यासाठी एक धाडसी निर्णय घेतला तो म्हणजे लाल महालात शिरून खानाला संपविण्याचा. लाल महालात आणि अवतीभोवती खडा पहारा असे आणि महालात शिरणे अतिशय जोखमीचे काम होते. एके रात्री लाल महालाजवळून जाणार्‍या एका लग्नाच्या मिरवणुकीचा आधार घेऊन काही मोजक्या माणसांसह स्वतः शिवाजी महाराज लाल महालात शिरले. महालाचा कानाकोपरा माहीत असल्यामुळे लवकरच प्रत्यक्ष शाहिस्तेखानच्या खोलीत शिवाजी महाराजांनी प्रवेश केला. तोपर्यंत महालात कोठेतरी झटापट सुरू झाल्यामुळे शाहिस्तेखानला जाग आली आणि तेवढ्यातच शिवाजीराजांना समोर पाहून खानाने जीव वाचविण्यासाठी सरळ खिडकीतून खाली उडी घेतली. शिवाजी महाराजांनी चपळाईने केलेला वार हुकल्यामुळे खानाच्या प्राणावर बेतण्याऐवजी त्याची तीन बोटे कापली गेली. या प्रकरणामुळे मुघल साम्राज्याची जी नाचक्की झाली ती स्वराज्यासाठी अधिकच फायद्याची ठरली. जे राजे मुघल आश्रयामुळे शिवाजी महाराजांना जुमानत नसत ते आता शिवाजीराजांच्या पराक्रमामुळे त्यांच्या बाजूने झुकले. आणखी एक वेगळा परिणाम या प्रकरणामुळे झाला तो म्हणजे शिवाजीराजांना मिळालेला मानवी क्षमतेपेक्षा मोठा दर्जा आणि त्यामुळे जोडलेल्या दंतकथा. अनेकदा या गोष्टीचा अप्रत्यक्ष फायदा शिवाजी महाराज किंवा त्यांच्या सैन्याला मिळाला. शत्रुसैन्यामध्ये शिवाजी महाराज घुसल्याच्या केवळ अफवा पसरवून संख्येने किरकोळ असलेल्या मावळ्यांनी संख्येने अनेक पटींनी मोठ्या सैन्याची उडविलेली दाणादाण ही याच गोष्टीची साक्ष देऊ शकते. इ.स. १६६३ सालचे शाहिस्तेखान प्रकरण शिवाजीराजांच्या जीवनात आणखी एका नाट्यमय प्रसंगाची भर घालून गेले.
सुरतेची पहिली लूट

इ.स. १६६४. सततची युद्धे आणि त्यामुळे रिता होत असलेला खजिना यामुळे शिवाजीराजे चिंतित होते. मुघलांना किंवा इतर सुलतानांना ही चिंता फार सतावीत नसे. अन्याय्य कर लादून किंवा बळजबरीने खंडणी जनतेकडून वसूल करण्यात बादशाही कारभारास कमीपणा वाटत नव्हता. अनेक दिवसांच्या खलबतांनंतर शिवाजीराजांनी शेवटी एक उपाय शोधून काढला तो म्हणजे इतिहासाला माहीत असलेली सुरतेची पहिली लूट. आजच्या गुजरात राज्यातील सुरत शहर हे तत्कालीन मुघल राज्यात होते आणि व्यापारामुळे अतिशय श्रीमंत शहरांमध्ये गणले जात होते. सुरत शहराच्या लुटीमुळे दोन गोष्टी साध्य करता आल्या, एक म्हणजे मुघल सत्तेला आव्हान आणि राज्याच्या खजिन्यात भर. लुटीचा इतिहास भारतामध्ये अतिशय रक्तरंजित आणि विनाशक आहे. त्या पार्श्वभूमीवर सुरतेची लूट ही पूर्णपणे वेगळी जाणवते. शिवाजीराजांच्या आज्ञेनुसार स्त्रिया, मुले आणि वृद्ध यांच्या केसालाही धक्का न लावता ही लूट केली गेली. मशिदी, चर्च यासारख्या देवस्थानांनाही लुटीतून संरक्षण दिले गेले.
मिर्झाराजे जयसिंह प्रकरण

इ.स. १६६५. औरंगझेबाने त्यांचे पराक्रमी सेनापती मिर्झाराजे जयसिंह याला प्रचंड सैन्यासह पाठविले. शिवाजीराजांचा प्रतिकार थिटा पडला आणि निर्णायक लढाईनंतर पुरंदरचा तह झाला आणि शिवाजीराजांना तहाच्या अटींनुसार २३ किल्ले द्यावे लागले. त्याबरोबरच स्वत: आग्रा (तत्कालीन मुघल राजधानी) येथे पुत्र संभाजी यासह औरंगझेबासमोर हजर होण्याचे कबूल करावे लागले.
आग्र्याहून सुटका
शिवाजी महाराजांना महाराष्ट्रात दैवत मानतात

इ.स. १६६६ साली औरंगझेबाने शिवाजीराजांना दिल्ली येथे भेटीसाठी आणि विजापूरवर त्यांनी केलेल्या आक्रमणावर चर्चा करण्यास बोलाविले. त्यानुसार शिवाजीराजे दिल्लीला पोहोचले. त्यांच्यासोबत सहा वर्षांचा संभाजी देखील होता. परंतु दरबारात त्यांना कनिष्ठ सरदारांच्या समवेत उभे करून शिवाजीसारख्या राजांचा उपमर्द केला. या अपमानामुळे अतिशय नाराज होऊन शिवाजीराजे तडक दरबाराबाहेर पडले असता त्यांना तत्क्षणी अटक करून नजरकैदेत ठेवण्यात आले. लवकरच त्यांची रवानगी जयसिंहाचे पुत्र मिर्झाराजे रामसिंग यांच्याकडे आग्रा येथे करण्यात आली. शिवाजीबद्दल आधीपासूनच धास्ती असल्यामुळे त्यांच्यावर कडक पहारा ठेवला होता. काही दिवस निघून गेले. सुटकेसाठी प्रयत्‍न फोल ठरले होते. शेवटी शिवाजीराजांनी एक योजना आखली. त्या योजनेनुसार त्यांनी आजारी पडल्याचे निमित्त केले आणि त्यांच्या प्रकृतीस्वास्थ्यासाठी विविध मंदिरांना मिठाईचे पेटारे पाठविण्यात येऊ लागले. सुरूवातीला पहारेकरी प्रत्येक पेटारा बारकाईने तपासून पहात पण काही दिवसांनी यात ढिलाई होऊ लागली. नंतर त्यांनी तपासण्याचेदेखील सोडले. या गोष्टीचा फायदा घेऊन एक दिवस शिवाजीराजे आणि संभाजी एकेका पेटार्‍यामध्ये बसून निसटण्यात यशस्वी झाले. कोणास संशय येऊ नये यास्तव शिवाजीराजांचा विश्वासू हिरोजी फर्जंद हा शिवरायांचे कपडे चढवून आणि त्यांची अंगठी दिसेल अशा पद्धतीने हात बाहेर काढून झोपल्याचे नाटक करीत होता. शिवराय दूरवर पोहोचल्याची खात्री आल्यावर तो देखील पहारेकर्‍यांना बगल देऊन निसटला. बराच वेळ आतमध्ये काही हालचाल नाही हे वाटून पहारेकरी आत गेले असता त्यांना तेथे कोणीही आढळले नाही तेव्हा त्यांना सत्य परिस्थिती समजली.

आग्रा येथून शिवाजीराजांनी वेषांतर केले आणि एका संन्याशाच्या वेषात महाराष्ट्रात प्रवेश केला. त्यातदेखील त्यांना अनेक खबरदार्‍या घ्याव्या लागल्या. संभाजीला त्यांनी वेगळ्या मार्गाने काही दुसर्‍या विश्वासू माणसांबरोबर पाठविले होते. ते स्वतः अतिशय लांबच्या आणि तिरकस, वाकड्या मार्गाने मजल-दरमजल करीत आले. उद्देश हाच होता की काही झाले तरी पुन्हा औरंगझेबाच्या हातात पडायचे नाही.

यात आणखी एक गोष्ट उल्लेखनीय आहे. दिल्लीभेटीपूर्वी त्यांनी राज्यकारभारासाठी जे अष्टप्रधानमंडळ स्थापले होते, त्या मंडळाने राजांच्या अनुपस्थितीमध्ये देखील राज्याचा कारभार चोख चालविला होता. हे शिवाजीराजांचे आणि अष्टप्रधानमंडळाचे फार मोठे यश आहे.
सर्वत्र विजयी घोडदौड

शिवाजीराजे परतल्यानंतर त्यांनी झालेल्या अपमानाचा सूड घेण्यासाठी पुरंदरच्या तहात दिलेले सर्व तेवीस किल्ले जिंकून घेतले. त्यांनी त्यातील पहिल्यांदा कोंढाणा घ्यायचे ठरवले. कोंढाण्याच्या लढाईत सुभेदार तानाजी मालुसरे यांस लढताना वीरमरण आले.
राज्याभिषेक
शिवाजी महाराजांची राजमुद्रा

६ जून इ.स. १६७४ रोजी शिवाजीराजांना रायगडावर राज्याभिषेक करण्यात आला. त्या दिवसापासून शिवाजीराजांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे चलन जारी केले.


त्याचा एक मावळा
उत्कर्ष शिंदे
(9890117570)
मदत - विकीपाडिया

माझ्या ब्लॉग मध्ये आपल स्वागत आहे

माझ्या ब्लॉग मध्ये आपल स्वागत आहे


माझा परिचय माझे गाव

महाराष्ट्र माझा मी महाराष्ट्राचा


माझा ब्लोग मध्ये आपला सर्वांचे स्वागत आहे.
माझा सातारा जिल्हा हा शूरवीररांचा आहे .
माझे गाव वाई तालुक्यातील किकली (देगाव) असून किकली येथे प्रसिद्ध असे श्री
भैरवनाथ यांचे प्रसिद्ध असे पांडव कालीन मंदिर आहे . या देवाची प्रसिद्ध असी यात्रा दसराचा पुढील शनिवार व रविवारी असी भरते . गावाच्या जवळच चंदन- वंदन हा किल्ला आहे .

तसेच आमच्या गावचे भूषण खासदार श्री . गजानन बाबर (मावळ ) असून ते सद्या खासदार असून ते किसन वीर सहकारी साखर कारखाना भुईंज याचे उपाध्यश सुद्धा आहेत याचा आम्हाला अभिमान आहे .
देगाव हे देखील वाई तालुक्यतील प्रसिद्ध ठिकाण आहे .

जय हिंद जय महाराष्ट्र,
जय भवानी जय शिवाजी
उत्कर्ष शिंदे

(9890117570)

तुझं आणि माझं जमणार तरी कसं?

तुला लागतो चहा , मला लागते कॉफ़ी
तुला नाही आवडत मी ऊलटी घातलेली टोपी
तुला वाजते थंडी , मला होतं गरम
तू आहेस लाजाळू , मी अगदीच बेशरम
तुझं आणि माझं जमणार तरी कसं?

झोपतेस तू लवकर आणि उठतेस पहाटे
आवडत नाही तुला बॉक्सिंग आणि कराटे
मी मात्र झोपतो बाराच्या नंतर
रविवारी नसतं क्रिकेटशिवाय गत्यंतर
तुझं आणि माझं जमणार तरी कसं?

फ़िरायला आवडतं , आवडतं तुला शॉपिंग
कपड्यांबद्दल बोलतेस अगदी विदाऊट स्टॉपिंग
मला मात्र खरेदीचा येतो कंटाळा
कळत नाही रंग राखाडी आहे की काळा
तुझं आणि माझं जमणार तरी कसं?

घालतो मी शर्ट इस्त्री न करता
जाऊन येतो एकटाच इतरांच न ठरता
तू मात्र बघतेस मैत्रिणींची वाट
बाहेर निघताना नखरे सतराशे साठ
तुझं आणि माझं जमणार तरी कसं?

मला नसतात लक्षात वाढदिवसाच्या तारखा
जातो बाजाराला पण काम विसरतो सारखा
तुला मात्र आठवते पाचवीतली मैत्रिण
बारीक तुझी नजर , डोळे आहेत की दुर्बीण?
तुझं आणि माझं जमणार तरी कसं?

एक सांगू का तुला ?
हे सगळं असुनही आहे तसं जमवुया का आपण?
ऊन आणि सावली राहतात ना जसं
तुझं आणि माझं जमेल का तसं?

लग्न का करावे?

हेमंत आठल्ये द्वारे काल शनिवार असून देखील कंपनीत कामाला बोलाविले होते. तसं दुपारी एकच्या सुमारास बोलाविल्याने माझी काही हरकत नव्हती. मी कंपनीत येण्याआधीच आमच्या कंपनीचा क्लायंट कंपनीत हजर होता. बर काम करत असताना ‘ती’ च्या लहान बहिणीचा फोन. आता मी त्या क्लायंट बरोबर असल्याने मी काही फोन घेतला नाही. दहा मिनिटात तीच्या लहान बहिणीचे दोन एसएमएस. एसएमएस मध्ये लिहिलं होत ‘खूप अर्जंट आहे मला फोन कर’. काही तरी खूपच महत्वाच काम आहे बहुतेक म्हणून मी तीच्या लहान बहिणीला फोन केला. तर ती म्हणाली की मला नवीन नोकरी लागली आहे. आणि मला संगणकाच्या प्रक्टिससाठी तुझा संगणक हवा आहे. तिला मी म्हणालो की मला आज गावी जायचं आहे. कंपनीतून मी डायरेक्ट निघेन. आणि मंगळवारी येईल. ती म्हणाली पण मला खूप आवश्यक आहे. तू काही तरी मार्ग काढ ना. तीला म्हटलं ठीक आहे. मी संध्याकाळी तुला संगणक देतो. बर म्हणून तिने फोन ठेवला.


क्लायंट च्या म्हणण्यानुसार मी काम करत असताना काही कामानिमित्त मला माझ्या सहकारणीचा संगणक सुरु करावा लागला. तिचा संगणक सुरु केल्या केल्या तिचे जीटौकचे ऑटोमेटिक साईन इन झाले. बहुतेक तसं तीन सेट करून ठेवले असावे. बर मी ते जीटौक बंद करणार तेवढ्यात तीच्या मित्राचा ‘हाय’ चा मेसेज आला. मी तीचे जीटौक बंद केले. घरी येताना बस पकडली. येताना बरेच दुचाकीवाले त्याच्या गर्लफ्रेंडला मागे बसवून फिरायला चाललेले. आता तीच्या बसण्याच्या पद्धतीवरून मी ती त्या दुचाकीवाल्याची गर्लफ्रेंड आहे अस म्हटलं आहे. खर तर हे पुण्यात काही नवीन नाही. आणि मी कधीही न पहिली अशीही गोष्ट नाही. पण तरी देखील अशा गोष्टी नेहमी बघायला मिळतात. खर तर येताना मी विचार करत होतो की माझ्या सहकाराणीचा पीसी सुरु आणि तीच्या मित्राचा ‘हाय’, ही काही नवीन गोष्ट नाही. परवा तिचा आणखीन एक मित्र तिला आपण रविवारी दुपारी तीन वाजता भेटायचे का म्हणून चाट वर विचारात होता. बर तो काही तिचा ‘बॉयफ्रेंड ‘ वगैरे नाही. खर तर तिचा बॉयफ्रेंड मुंबईचा पण हिला पुण्यात फिरवणारे काही कमी नाही. तसं म्हणायचं झाल तर त्यांनी हिला फिरावाण्यापेक्षा हीच त्यांना फिरवते अशी शंका येते.



आमच्या शेजारी तर काही विचारू नका. दोघा नवरा बायकोची खूप भांडण होतात. पण जय शेजारच्या बायकोचाच होतो. मी अनेक जण बघितली आहेत. पण लग्न करून सुखी अस कोणीच नाही. माझा बॉस नेहमी कंपनीतून निघताना त्याच्या बायकोचा फोन येतो. की ताबडतोप या म्हणून. आज सुद्धा क्लायंट मध्ये एक लेडीज होती. ती काही म्हणाली की तिचा कलीग ताबडतोप ‘राईट’ म्हणायचा. माझा एक मित्र आहे त्याचे लग्न होऊन साधारणत एक वर्ष झाल असेल त्याला एकदा मी विचारलं होत की ‘कस वाटत लग्न आधी आणि आता?’ त्यावेळी तो म्हणाला होता ‘आपल्याला वाटत की खूप मजा असते म्हणून पण खर तर खूप जबाबदारी असते. एका जीवाचा सांभाळ आणि संरक्षण’. त्याच्याशी चर्चा केल्यावर तो पहिल्यापेक्षा अधिक चिंतेत वाटला होता. माझ्या काका काकूला बघून, मित्र आणि त्याच्या बायकोला बघून, मावशी आणि तिचे मिस्टर बघून, माझ्या बॉस ला बघून अस वाटल नाही की लग्न करून कोणी सुखी झाल आहे. उलट अनेक बंधन आली अस वाटल. बॉसला कंपनीतून निघताना बायकोला मी कंपनीतून निघून घरी येतो आहे अस सांगावं लागत. सहकार्णीच काही विचारू नका. तिचा बॉयफ्रेंड तिला फोन करतो. पण मी अस कधी बघितलं नाही की ने स्वताच्या मोबाईल वरून त्याला फोन केला. जाऊ द्या हा विषय वेगळा आहे. तात्पर्य फ़क़्त एकाच लग्न करून मला तरी काही आपण सुखी आनंदी राहू अस वाटत नाही.



म्हणजे विकेंड असला की तीच्या इच्छे खातर कधी मॉल मध्ये जाऊन हजार- दोन हजाराचा चुराडा करायचा. बर ती घेणार काय तर चप्पल किंवा ड्रेस. आणि तो देखील फार फार तर सहा महिने वापरणार. तिथून मग तिची इच्छा हॉटेलमध्ये जेवण करण्याची. झाल ते होऊन देखील कधी हे पाहिजे तर कधी ते पाहिजे. म्हणजे आपण कशासाठी जगतो हेच कळत नाही. कंपनीतील नोकरी झाली की बायकोची चाकरी. आता मला याचा काही अनुभव नाही पण मी ज्या ज्या जणांचे लग्न झालेले आहे त्यांना बघून तरी लग्न म्हणजे न संपणाऱ्या बायकोच्या इच्छा. मग मुले. त्यांची शाळेची, त्यांच्या अभ्यासाची काळजी आपण करायची. अस सगळ गडबड गोंधळ बघितला की वाटते लग्न का करावे?

मराठी माणूस..... .............

प्रत्येक गावाची एक संस्कृती

प्रत्येक गावाची एक संस्कृती असते. त्या नुसार ते गाव जगत असते. गावाचे स्वभाव घडत असतात. यात कोणीच काहीच न ठरवता हे घडत असते.
त्या गावाचे रहिवासी हा स्वभाव घडवतात की गाअ रहिवाशांचे स्वभाव घडवते हे सांगणे कठीण.
आता हेच बघा ना
कोल्हापुरकर म्हंटले की मनमोकळा कुस्ती आणि चित्रकलेवर मनापासून प्रेम करणारा हेच डोळ्यापुढे येते.
अंबाबाई आणि जोतिबा यांच्या यात्रेच्या आठवणी काढणारा शाहु महाराज आणि त्यानी मारलेल्या वाघांच्या शिकारीच्या गप्पा , खासबाग मैदानात कधी काळी झालेल्या मारुती माने /सत्पाल /बिराजदार यांच्या कुस्त्यांच्या आठवणीत रंगणारा कोल्हापुरकर.
पांढरा तांबडा रस्सा दिलखुलास खिलवणारा कोल्हापुरकर.........
पहिल्याच भेटीत एखाद्याला आपले मानणारा / फारसे आतबाहेर न ठेवता बोलणारा कोल्हापुरकर. त्यांच्याशी बोलताना ते तुम्हाला सुद्धा राजे बनवून टाकतील. स्त्रीया सुधा बोलताना मी आलो होतो असे सहज म्हणून जातील. त्यांच्या लेखी आलो होतो / गेलो होतो हे दोन शब्द नसून मी आल्तो मी गेल्तो अशी जोडाक्षरे होतील. एखादी मुलगी घरात आली तर " आलास काय गा"? असे आई विचारेल
"तो यायला लागला आहे" हे अख्खे वाक्य " तो यायलाय" एवढ्या दोन शब्दात आटोपेल.
कोल्हापूरकर आंबाबाईच्या देवळात गेला तर चपलाची चिंता न करता सावकाश दर्शन घेईल.
कोल्हापुरकर राजकारणाबद्दल फारसे बोलणार नाही पण थोरले महाराज , चित्रकार दलाल , बाबुराव पेंटर यांच्याबाबत बोलताना तो खुलतो.

सांगलीची गोष्ट थोडी वेगळी.
कोल्हापुर ला राजे होते सांगलीला संस्थानीक होते. राजा आणि संस्थानीक यात असेल तेवढा फरक या जवळ जवळ वसलेल्या दोन्ही गावांत आहे . राजेपणाची मस्ती नसेल; संस्थानीकाचा हिषेबीपणाआहे.
सांगलीकर गणपतीच्या देवळात रमेल पण तेवढ्याच पटकन देवळातून पाय बाहेर काढून जयसिंगपुरच्या एम आय डी सी त निघेल.
हळद वायदेबाजारात जाईल. गप्पा हाणताना दादा बापू भाऊ या पेक्षा जास्त बोलणार नाही. पण राजकारणात मुरलेला असेल.
जेवणात कोल्हापुरी तर्री नसेल ब्राम्हणी पुरणपोळी असेल. कोल्हापूरकराला मिसळीची नशा असेल सांगलीकर गोरे बंधू भडंगावर समाधान मानेल.
सांगलीकर बोलताना कोणत्याही व्यक्तीला " ते " बनवतील. आदराने नव्हे भाषेच्या लहेज्यामुळे. कॉलेजचे प्राचार्य आले तरी " ते येतय बघ " असे म्हनतील.
तुम्ही त्याना चहा पाजलात तरी ते आपल्या गावच्या चौकात " इंदीराभुवनच्या " शेजारी ये तुला असा चहा पाजतो असा चहा पाजतो असा चहा पाजतो असे म्हणतील. स्वतः निवान्त चहा पिईल आणि आपल्याला घाई करेल

मुम्बैकर मुम्बैत एकदम पटकन कोणाबरोबरही मोकळा न होणारा पण एकदा मुम्बै बाहेर पडला की स्वतःची सामान्यत्व कबूल करत सहज संवाद साधतो.
तो वर्तमानपत्राची घडी सुद्धा उभी घालतो.
जागा आणि जागांचे भाव हे कोणत्याही मुम्बै कराचे जिव्हाळ्याचे विषय.
एरवी शेजार्‍याशी ही फारसा संभाषण करणार नाही पण वेळ पडली तर न मागता सुद्धा अनोळख्याला भरभरून मदत करेल.
तुम्ही एखादा पत्ता विचारा ठाऊक असेल आणि शक्य असेल तर मुम्बैकर तुम्हाला केवल पत्ता सांगून थांबणार नाही. दाखवायला ही येईल/
पुण्यात हा अनुभव भलताच वेगळा येतो. पावसात तुम्ही भिजताय मुम्बैकर तुम्हाला आपल्या छत्रीत जागा देईल. रांगा लावणे हे मुम्बैकराच्या हाडीमांसी इतके भिनलेले आहे की बागेत छोटी मुले सुद्धा घसरगुंडीसाठी रांग लावून उभी रहातील

सातारकर हे तिरकस बोलण्यात पटाईत. काय कसे आहात ? या प्रश्नाला " बरे आहे/ मजेत आहे" असली सरळ उत्तरे न येता " मला काय धाड भरली आहे" असला निरुत्तर करणारा प्रश्न सातारकरच विचारु शकतो.
चर्चेत हिरीरीने भाग घेईल. सकाळी सकाळी भारत भुवनची रस्सेदार पुरी भाजी हा यांचा आवडता नाश्ता. पंधरा ऑगस्ट ला रस्तोरस्ती लागणारे जिलेबीचे स्टॉल हे सातार्‍याचे एक वैषिष्ठ्य.
अशोक मोदी ची किंवा लाटकरची आंबा बर्फी / पेढे हे जिव्हाळ्याचे विषय. नुकत्याच कोठेतरी झालेल्या राज्यस्तरीय एकांकीका स्पर्धेत अमूक एका एकंकिकेत लाईट ची अ‍ॅरेन्जमेन्ट कशी चुकीची होती/ अमूक एकाने दिग्दर्शन कसे करायला हवे होते ही चर्चा उद्यासाठी अर्धी राखून ठेवत अर्धा ग्लास दुध पिऊन रात्री दोन वाजता घरी जाणे हे सातार्‍यातच नियनीतपणे होऊ शकते.
दिवाळीच्या दिवशी न ठरवताही खिंडीतल्या गणपतीला भेटणारे आख्खे गाव हे सातारकरच करु जाणे
सातार्‍याची एम आय डी सी कशी झोपली या चर्चा बारामतीमुळे हे असे झाले या निष्कर्षला येतात.

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज ज्ञावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।
भूतां परस्परे पडो । मैत्र जीवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्र्मे जे अलांछ्न । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ।

येथ म्हणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

आता विश्वात्मकें देवें येणे वाग्यज्ञें तोषावें
तोषोनिं मज ज्ञावे पसायदान हें

जें खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी- रती वाढो
भूतां परस्परे पडो मैत्र जीवाचें

दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्यें पाहो
जो जे वांच्छिल तो तें लाहो प्राणिजात

वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी
अनवरत भूमंडळी भेटतु भूतां

चलां कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचें गाव
बोलते जे अर्णव पीयूषाचे

चंद्र्मे जे अलांछ्न मार्तंड जे तापहीन
ते सर्वांही सदा सज्जन सोयरे होतु

किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी
भजिजो आदिपुरुखी अखंडित

आणि ग्रंथोपजीविये विशेषीं लोकीं इयें
दृष्टादृष्ट विजयें होआवे जी

येथ म्हणे श्री विश्वेशराओ हा होईल दान पसावो
येणें वरें ज्ञानदेवो सुखिया जाला

= ज्ञानेश्वर माउली

marathi kavita

तुझं आणि माझं जमणार तरी कसं?

तुला लागतो चहा , मला लागते कॉफ़ी
तुला नाही आवडत मी ऊलटी घातलेली टोपी
तुला वाजते थंडी , मला होतं गरम
तू आहेस लाजाळू , मी अगदीच बेशरम
तुझं आणि माझं जमणार तरी कसं?

झोपतेस तू लवकर आणि उठतेस पहाटे
आवडत नाही तुला बॉक्सिंग आणि कराटे
मी मात्र झोपतो बाराच्या नंतर
रविवारी नसतं क्रिकेटशिवाय गत्यंतर
तुझं आणि माझं जमणार तरी कसं?

फ़िरायला आवडतं , आवडतं तुला शॉपिंग
कपड्यांबद्दल बोलतेस अगदी विदाऊट स्टॉपिंग
मला मात्र खरेदीचा येतो कंटाळा
कळत नाही रंग राखाडी आहे की काळा
तुझं आणि माझं जमणार तरी कसं?

घालतो मी शर्ट इस्त्री न करता
जाऊन येतो एकटाच इतरांच न ठरता
तू मात्र बघतेस मैत्रिणींची वाट
बाहेर निघताना नखरे सतराशे साठ
तुझं आणि माझं जमणार तरी कसं?

मला नसतात लक्षात वाढदिवसाच्या तारखा
जातो बाजाराला पण काम विसरतो सारखा
तुला मात्र आठवते पाचवीतली मैत्रिण
बारीक तुझी नजर , डोळे आहेत की दुर्बीण?
तुझं आणि माझं जमणार तरी कसं?

एक सांगू का तुला ?
हे सगळं असुनही आहे तसं जमवुया का आपण?
ऊन आणि सावली राहतात ना जसं
तुझं आणि माझं जमेल का तसं?



कॉलेज गारवा
Syllybus जरा जास्तच आहे
दर वर्षी वाटतो...
Chapters पाहून Passing चा
Problem मनात दाटतो...

तरी lectures चालू राहतात
डोक्यात काही घुसत नहीं....
चित्र-विचित्र figures शिवाय
Board वर काहीच दिसत नाही....

तितक्यात कुठून तरी Function ची
Date जवळ येते...
Sem मधले काही दिवस
नकळत चोरून नेते...

नंतर lecturers Extra घेउन
भरभरा शिकवत राहतात...
Problems Example Theory सांगून
Syllybus लवकर संपवू पाहतात...

पुन्हा हात चालू लागतात...
मन चालत नाही....
सरांशिवाय वर्गामध्ये
कुणीच बोलत नाही...

Lectures संपून Submission चा
सुरु होतो पुन्हा खेळ..
journal Complete करण्यामध्ये
फार फार जातो वेळ...

चक्क डोळ्यांसमोर Syllybus
चुटकी सरशी sampun जातो..
'PL's मध्ये वाचून सुद्धा
Paper काबर सो...सो.. जातो?????

तुला दोन मुले जाली मी अजुन शिकतो आहे............ !
तुला दोन मुले जाली मी अजुन शिकतो आहे............ !
कळत नाही तुज बरोबर की मी कुठेतरी चुकतो आहे,
तुला दोन मुले जाली मी अजुन शिकतो आहे............ !
B.Sc
करून Bad जालो M.Sc करून Mad जालो,
सुखाच्या शोधात मी फक्त फक्त Sad जालो,
शिकतो तरी लोक म्हणतात मी कुठेतरी हुकतो आहे,
तुला दोन मुले जाली मी अजुन शिकतो आहे............ !
किती सहज म्हानाली होतीस की 'तुला लागणार का नोकरी..?
नोकरीच नाही तुला तर कोण देणार छोकरी..?
तुज्याविना, नोकरिविना मी मात्र सुकतो आहे,
तुला दोन मुले जाली मी अजुन शिकतो आहे............ !
तुजा मुलगा मामा म्हणतो याच थोड वाईट वाटत,
तुज्या नवरयाच साध शेकहैण्ड मला जबरदस्त फाइट वाटत,
हसरा हसरा संसार तुजा रडता रडता बघतो आहे,
तुला दोन मुले जाली मी अजुन शिकतो आहे............ !
मला बक्षीश मिळाले की तूच टाळ्या वाजवायची,
सर्वांदेखत अभिनन्दन करून मला मात्र लाजवायची,
तुज्याविना कित्येक सत्कार आज गळ्यामधे टाकतो आहे,
तुला दोन मुले जाली मी अजुन शिकतो आहे............ !
किती बोलायचो आपन बोलण्यावर बंधन नसे,
मी जालो विस्तव की तुज्या शब्दात चन्दन असे,
आता केवळ ओठवरती मी कुलुप ठोकतो आहे,
तुला दोन मुले जाली मी अजुन शिकतो आहे............ !
बाप राब राब राबतोय मायचे हाल सांगत नाही,
उगाच तुला माज्यासाठी सहानुभूति मागत नाही,
फी साठी पार्ट टाइम जॉब करून रोज रोज थकतो आहे,
तुला दोन मुले जाली मी अजुन शिकतो आहे............ !
माज्या गळ्यात पडलाय नुसता वचनांचा नाग,
नोटांच्या बंडलानी लागली शिक्षनाला आग,
तरीही या अग्निकुंडामधे स्वताला जोकतो आहे,
तुला दोन मुले जाली मी अजुन शिकतो आहे............ !
नोकरी नाही, भाकरी नाही, एवढाच गुन्हा नसतो,
थोडा विश्वास ठेवायचा होता माज्या अंगातही होत रक्त,
येओ आता वादले कितीही, दिवा माजा टिकतो आहे,
तुला दोन मुले जाली मी अजुन शिकतो आहे............ !
तुला दोन मुले जाली मी अजुन शिकतो आहे.........




एक अबोल प्रेम फुललेच नाही !!
एक अबोल प्रेम फुललेच नाही !!
दोघांच्याही मनात होतं,
दोघांनाही ते ठाऊक होतं
कुनी कधी काही बोललेच नाही…..
एक अबोल प्रेम फुललेच नाही !!
जाण्या-येण्याच्या वेळाही एक,
ठरुनच गेल्या होत्या बहुतेक
वाटा दोहोंच्या जुळल्याच नाही
एक अबोल प्रेम फुललेच नाही !!
नजर भिरभिरते,एकमेंका शोधते;
दृष्टा-दृष्ट झाल्यास मनी सुखावते
नजरेपलिकडे काही घडलेच नाही
एक अबोल प्रेम फुललेच नाही !!
नसेना का घडले मिलन परि…
आजन्म फुलतिल प्रेमांकुर ऊरी
नियतीचे कोडे कधी उलगडलेच नाही!






तु मला खुप आवड्तेस

तु मला खुप आवड्तेस

अस तिच्या कानात जाउन सान्गाव

तिच्या मनात काय आहे

ते पट्कन तिच्या ओठावर याव

तुझ्या डोळ्य़ात कहीतरी आहे

अस म्हणत चट्कन नजरेत नजर मिसळावी

तुझ्या केसात काहीतरी पड्ल म्हणत

काळ्याभोर रेशमी केसाना हात लावावा

.

मच्छर बसला होता अस सान्गुन

गो

-या हातावर एक चापट मारावी .

मग तिने राग आल्यासा्रख करुन

चापटीने त्वचेवरची लाली दाखवावी

कधी नकळ्त तिचा हात हातात घ्यावा

आणी तिचा नाजुक उबाबदार स्पर्श व्हावा

जाणीव होताच तिने हात खेचुन घ्यावा

वाट्त असा शण दिवसातुन एकदातरी यावा

समोर उभी असताना नजर सळसळत असते

तिला वाट्ते माझी नजर तिलाच बघत असते

मग काहीतरी फ़ेकुन मारण्याची धमकी देत असते

तर कधी मी निघुन जाईन अशी भिती दखवत असते

Travle spot in Satara (WAI)


SATARA(WAI)





Satara District is located in the western part of Maharashtra. It is bordered by Pune District in the north, Solapur District in the east, Sangli District in the south, Ratnagiri District in the west and Raigad District in the north-west. The main rivers are Koyna and Krishna. Bajra, jowar, wheat, rice, sugarcane, groundnut and potato are the Main crops.

Satara was once the capital of Maratha kingdom. Karad city is an old place where you can find temples and Buddhist caves. Ajinkyatara Fort, Char Bhinti Hutatma Smarak, Thoseghar Waterfall, Kas Talav (lake), Natraj Mandir, Tapola Lake (for boating) and Pratapgad Fort are the major tourist spots. Kuraneshwar Temple, Yevateshwar Temple, Shikhar Shinganapur Temple, Siddhanath Temple at Mhaswad, Yamai Devi Temple at Aundh and Bhavani Temple on Pratapgad are some of the holy places. Satara District is famous for the Shivaji Museum at Satara and Bhavani Museum at Aundh.
Wai also is famouse Travle spot in Satara District in Wai , the Dholya Ganpati Mandir , Kishiwishwashwar Mandir is famouse spot in wai city, also the MARAHI VISHVAKOSH KARALYA is present in Gangapuri in Wai .


Around the wai many travle spot avilable like Manavli , Kamlgad Fort , Pandavgad Fort , Rayreshwar Fort , Dohum DAM , Viratgad Fort , CHANDAN VANDAN FORT ,
Kalubai Mandir , Bhavani Mata Mandir Asle , BHRAVNATH MANDIR KIKALI (Near BHUINJ), near from that the KISAN VEER SUGAR INDUSTRY , in that industry many project are avilable to see Specialy AKHAND HARINAME SAPTAHE.
From wai we can go to PANCHAGANI , MAHABALESHWAR are the famouse spot is present.


UTKARSH SHINDE
9890117570